Harihar Fort हरिहर किल्ला

हरिहर हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी च्या पश्चिमेस वीस किमी अंतरावर वसलेला आहे.Harihar Fort हर्षगड या नावानेसुद्धा ओळखला जातो. किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. 1636साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली.

Harihar Fort हरिहर किल्ला

Harihar Fort हरिहर किल्ला

8 जानेवारी 1689 रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने Harihar Fort जिंकला. शेवटी 1818 मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे.

कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते. हरिहर हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खड्या जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे.

हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1120 मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. किल्ला प्रेमी harihar fort trek करतात.

1818 सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्याचे वर्णन शब्दात करणे कठीणच आहे.

200 फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात. खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते.

त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला. पण त्याच्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पायऱ्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

See also  राज्य सरकारचा मोठा निर्णय या योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार पंचात्तर हजार रुपये State Government Decision

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती

Harihar Fort वर पाहण्यासारखे काय आहे?

या किल्ल्याच्या डोंगरावर गेल्यावर मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले अनगड देव आपणास दिसतील. त्यांच्या मध्यभागी एक त्रिशूळही रोवून ठेवलेला असून हा अनामिक देवतांचा दरबार येथून जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. पुढे गेल्यानंतर आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्र अशा काळ्या पहाडासमोर येतो.

हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पायऱ्याच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गा रोहणाचा अद्भुत अनुभव देऊन जातो. याबद्दल मनात तिळमात्र शंका उरत नाही. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पायऱ्या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी.

औरंगाबाद शहर – Aurangabad Information In Marathi

शेवटी साधारण नव्वद पायऱ्यांचा सोपान चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. आपण येथे थोडा वेळ थांबून थंडगार वायाचा आनंद घ्यायचा व पुढील चढाईस ताजेतवाने व्हायचे.

हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात. गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल. या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत साधारण 130 पायऱ्याचा दगडी जिना लागतो.

या मार्गाच्या दोन्ही बाजूस सुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेश द्वारात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते.

त्यामुळे वरूनच ही गुहा पाहून पुढे गेल्यावर गडाच्या सदरेचे अवशेष आपणास दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसेल.

See also  शेळीपालन व्यवसायासाठी आता 25 लाखापर्यंत कर्ज Goat Loan

पुढे पायवाटेच्या उजव्या हातास 50-60 फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळटप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच अगदीच छोट्या सपाटीवर देवांची दाटी दिसते. या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापड्या ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.

खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी 30 फूट लांब व 12 फूट रुंद अशा या दगडी कोठीत जावे. कोठीचा प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.

हरिहर गडावर कसे जाल? How to Reach Harihar Fort Nashik

हरिहरला गडाला भेट देण्यासाठी आपण नाशिकच्या बसस्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण निरगुडपाडा गावात उतरायच. बसमधून पायउतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर ऊर्फ हर्षगडचा वैशिष्टयपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. जे दुर्गप्रेमी त्र्यंबकेश्वरहून इकडे येणार आहेत, त्यांना सोईचा असा एक दुसरा मार्गसुद्धा आहे.

त्र्यंबकेश्वराहून मोखाडा किंवा जव्हारला जाणाऱ्या बसने त्यांनी साधारण 15 किमीचा प्रवास केल्यावर डाव्या हातास हर्षवाडी फाट्यावर उतरावे. येथून कळमुस्ते मार्गे साधारण 4 किमीची पायपीट केल्यानंतर आपण हर्षवाडीजवळ येऊन पोहोचतो. येथून एका बंधाऱ्याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्या समोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो.

See also  Aundha Nagnath औंढा नागनाथ

या रम्य वाटेवर एक आश्रम, त्याच्या शेजारी प्राचीन दगडी पुष्करिणी व गणेश मंदिरही आपणास पाहता येते. निरगुडपाड्यावरून काय किंवा हर्षवाडीकडून काय, दोन्ही वाटा आपणास साधारण तासाभराच्या पायपिटीनंतर हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर आणून सोडतात.

किल्ल्यावरील मंदिरे Temple

या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळ पायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला 4-5 पाण्याने भरलेल्या कातळ टाक्या दिसतात.

डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहण प्रेमींकरता हा एक पर्याय आहे.

इतिहास (History)

हरिहर किल्ल्याला हर्षगड सुद्धा म्हटले जाते. हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी 1636 साली निजामशाहीची पुन:स्थापना करते वेळी त्र्यंबकगडा सोबत हा किल्लासुद्धा जिकला होता.

पहिला मार्ग

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या 3 किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.

दुसरा मार्ग

नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना, त्र्यंबकपासून लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते. “तुम्हाला आमची Harihar Fort माहिती विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment