पर्यावरण विषयी निबंध – Essay On Environment In Marathi Language 2021

Essay On Environment In Marathi Language 2021

5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धन याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिवस साजरा करण्यामागचा हेतू असतो. पर्यावरण हा शब्द, फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे.

त्याचा अर्थ सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रिया मधून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असा उल्लेख केला जातो. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील अपघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीच्या फळां बरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवजातीला भेडसावू लागल्यामुळे 1960 मध्ये पर्यावरण शास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान विषय अभ्यासण्यासाठी स्वतंत्रपणे लागू करण्याचे ठरविण्यात आले.

नक्की वाचा – माझे बाबा मराठी निबंध

पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

मानव हा पर्यावरणाचा एक बुद्धिमान घटक आहे. पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवाचा हस्तक्षेप असतो म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण झाले आहे.
आज आपण पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करतो. ते म्हणजे पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान. पर्यावरण विज्ञान काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर पर्यावरणामध्ये तत्त्व सिद्धांत व जैविक, अजैविक घटकांमधील आंतरक्रिया यांचा अभ्यास आपण करत असतो.

नक्की वाचा – इंदिरा गांधी विषयी निबंध – Indira Gandhi Information In Marathi 2021

पर्यावरण शिक्षणात परिसंस्था, रचना, कार्य, संरक्षण व संवर्धनाचे विविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, मानवी व नैसर्गिक जैविक लोकसंख्या पर्यावरणाची धारणक्षमता निरंतर श्वासत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका या कार्याचा आपण यामध्ये अभ्यास करत आहोत. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व समबोधक आणि सिद्धांत याबरोबरच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण तत्त्वज्ञान यांचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारण यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

मॅन अँड नेचर या पुस्तकात मानव व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्याचे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. 1899 मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आउटलुक टोक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य पर्यावरण शिक्षण सुधारणा असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव निर्माण करून तसेच जागृती निर्माण करणे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी 1965 मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षण शास्त्रात समाविष्ट करण्यात आला.

See also  Us Todani Yantra Machine Yojana 2023| ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

तर 1970 मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. 1972 मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाची असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर, 1975 मध्ये बेलग्रेड येथील कृती सत्रात ठरविण्यात आली. पर्यावरण शिक्षण या पर्यावरण विषयी ज्ञान आकलन कौशल्य जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपले सकारात्मक मनोभूमिका निर्माण करावी.

पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

तसेच पर्यावरण शिक्षण हे एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंघ आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण(Essay On Environment In Marathi Language) शिक्षणाचे मुख्य ध्येय ठरविण्यात आली. मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रिया मुळे पर्यावरण गुणवत्तेचा होणारा ऱ्हास नैसर्गिक प्रक्रिया यामुळे निसर्गातील परिसंस्थांमध्ये होऊन तसेच हवा अशा संसाधनाचा पर्यावरणाची गुणवत्ता घटते संयुक्त राष्ट्रसंघाची सामाजिक व परिस्थिती उद्दिष्टांची गरज यांची पूर्तता करण्याच्या पर्यावरण म्हणजे पर्यावरण ऱ्हास होय.

नक्की वाचा – Mi Pantpradhan Zalo Tar Essay In Marathi 2021 जर मी पंतप्रधान झालो तर…

काही नैसर्गिक प्रक्रिया आणि मानवी कृती पर्यावरणाची (Essay On Environment In Marathi Language)आणि ती होण्यास कारणीभूत ठरतात. यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे काही काळानंतर हे पर्यावरणवादी तिचे प्रमुख कारण आहे. मनुष्य आपल्या जीवनातील दैनंदिन वापरातील वस्तूंच्या निर्मितीसाठी विविध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कच्चामाल म्हणून करत असतो. वस्तूंच्या वाढत्या निर्मितीमध्ये नैसर्गिक संसाधनाचा अधिकाधिक त्रास झाल्यामुळे पर्यावरणाचा(Essay On Environment In Marathi Language) समतोल बिघडतो. तसेच संसाधनाच्या अतिवापरामुळे अपशिष्ट निर्माण होते.

See also  Maharashtra Government Decision सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी 12 निर्णय

यामुळे वातावरणात राहणारे सजीव तसेच मानवी जातींचे मोठे नुकसान होते व त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये सामाजिक आर्थिक तसेच स्नायू व अपायकारक गोष्टींमुळे मृदा व भुमी यांचा सुद्धा ऱ्हास होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादनासाठी वाढलेला वापर हे सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण ठरू शकते.

पर्यावरणातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्ष तोडीमुळे मोठ्या प्रमाणात निर्वणीकरण होत आहे. त्यामुळे शेतीचा विस्तार वाढतो, स्थलांतरित शेती, डोंगर उतार शेती यामुळे जमिनीचा ऱ्हास होतो. म्हणजेच पृथ्वीचा ऱ्हास झाल्यामुळे पर्यावरणाची हानी होते. विविध प्रकारच्या विकास कामासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने देखील नैसर्गिक पर्यावरणात बदल होतांना आपल्याला दिसत आहे. मोठ्या धरणांच्या बांधकामामुळे जलाशय निर्मिती होते, परंतु खडकांची संतुलन बिघडते. तसेच जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते, वाढती लोकसंख्या पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत आहे.

वाढलेल्या लोकसंख्येमुळे संशोधनाची मागणी वाढते. मात्र संसाधने हे मर्यादित असल्यामुळे सर्व गरजांची पूर्तता करणे अशक्य आहे. हे लोकांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. तरी असेच चालत राहिले तर 2050 सालापर्यंत जगाची लोकसंख्या व जास्तीत जास्त वाढवून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊन जाईल. याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

प्रदूषणापासून पर्यावरणाचे रक्षण करता येते. पर्यावरण ऱ्हासामध्ये ही मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रिया यामुळे पर्यावरणाची(Essay On Environment In Marathi Language) गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. त्यामुळे परिस्थितीकीय असमतोल निर्माण होऊन परिसंस्था आणि जैवविविधता यावर विपरीत परिणाम होतांना आपल्याला दिसत आहेत. परिस्थितीकीय असमतोल हे पर्यावरण ऱ्हास तिचे एक मोठे लक्षण आहे. सजीवांच्या निरीक्षणातून ते सहज दिसून येते.

काही वेळा भूकंप व ज्वालामुखी भूमिपात, चक्रीवादळे व पूर, अवर्षण, उष्ण व शीत वादळ लहरी इत्यादी नैसर्गिक प्रक्रियांमुळे जलदगतीने पर्यावरनाचा ऱ्हास होते, त्यामुळे पर्यावरण उपयुक्ततेचे मूल्य कमी होते. पर्यावरणातील बिघाडामुळे मानवासह इतर काही सजीवांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. नैसर्गिक पर्यावरणाच्या स्वास्थ्यात आपत्तीजनक स्थिती निर्माण होते. जैवविविधता येथील लक्षणीय घट होते. पृथ्वीवरील जीवनामध्ये एक विलक्षण अशी आंतर विन असते त्यातील एखाद्या घटकातील गुणधर्मात बदल झाल्यास त्या घटकाशी निगडित असलेल्या इतर घटकांचा विविध गुणधर्मांवर परिणाम होतो. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास सुद्धा होतो.

See also  My Hobby Essay in Marathi | माझा आवडता छंद

पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

नैसर्गिक परिसंस्थेत बदल झाल्यामुळे काही वेळा हे बदल खूप मोठ्या प्रमाणात भूप्रदेशावर घडून येतात. या बदलांचा भौतिक परिसंस्था वर मोठा परिणाम होतो. परिसंस्थेतील असणारे ओझोन, अवक्षय, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र इत्यादींमध्ये खूप मोठे बदल होतात. जागतिक तापमान हे व्यापक स्तरावरील परिसंस्था बिघडल्याचे व पर्यावरण ऱ्हासाचे ज्वलंत उदाहरण आहे. पर्यावरणाच्या आणि त्यामुळे असंख्य किनारी परिसंस्था धोक्यात आले आहे.

आशियातील एकूण 70 टक्के तर युरोपातील 80 टक्के किनारी प्रदेश पर्यावरण अवनतीग्रस्त आहेत.
जर आपण वेळीच पर्यावरणाची काळजी घेतली तर होणारी जमिनीची धूप वातावरणातील वायूंचा थर याचे प्रमाण संतुलित राहील. पर्यावरणाची आपण निगा राखली तर पर्यावरण (Essay On Environment In Marathi Language) आपले निगा राखू शकेल. पृथ्वीवर असणारे जलचक्र देखील पर्यावरणामुळेच शक्य आहे. आपण पर्यावरण दूषित केले तर पर्यावरण आपल्याला दूषित करेल म्हणून झाडे लावा व पर्यावरण वाचवा हा संदेश यामधून घेणे महत्वाचा आहे.

पर्यावरण आणि मानव हे दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत, म्हणून पर्यावरणाला (Essay On Environment In Marathi Language) वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावून पृथ्वीला सुजलाम-सुफलाम बनविले पाहिजे व घरे बांधण्यासाठी जंगलतोड कमी प्रमाणात करायला पाहिजे. तसेच मानव आणि सर्व सजीव प्राणी हे अन्नाशिवाय जगू शकत नाही आणि त्यांना पाण्याचीही गरज असते. त्यामुळे मानवाला जगण्यासाठी पाणी, हवा हे सर्वात उपयुक्त असते. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.

तुम्हाला जर Essay In Marathi बद्दल अजून जाणून घायचे असेल तर Gyangenix वेबसाईटला नक्की भेट द्या .

Leave a Comment