Tushar Sinchan Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री शाश्वत सिंचन तुषार सिंचन योजना” शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेत ५ हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी सिंचन सुविधा कमी दरात मिळते. अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना ९०% पर्यंत तर इतरांना ७५% पर्यंत अनुदान दिले जाते.
पाण्याचा शाश्वत आणि कार्यक्षम वापर करून शेती उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना – तुषार सिंचन’ ही उपयुक्त योजना राबवली आहे. ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY) अंतर्गत सुरू असून तिचा उद्देश म्हणजे सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि उत्पादनात वाढ घडवून आणणे.
पीएम विश्वकर्मा योजनेतून गवंडी, सुतार, टेलर यांना मिळणार मोफत कीट व ₹१५,०००
योजनेचे लाभार्थी कोण?
या योजनेचा लाभ सर्व प्रकारचे शेतकरी घेऊ शकतात – विशेषतः
- अत्यल्प भूधारक
- अल्प भूधारक
- अनुसूचित जाती, जमाती व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय शेतकरी
आवश्यक कागदपत्रे:
- ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा
- पात्रतेचे सर्व प्रकारचे प्रमाणपत्र (SC/ST/OBC वगैरे)
- पाण्याचा स्रोत उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र
लाडकी बहिण योजनेचा भार! ४ सरकारी योजना बंद होणार – सर्वसामान्य, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांवर ताण
खर्च व अनुदानाचा तपशील:
तुषार सिंचनासाठी लागणाऱ्या पाईपचा व्यास व क्षेत्रानुसार खर्च खालीलप्रमाणे आहे (सर्व किंमती रुपये):
| क्षेत्रफळ (हेक्टर) | ६३ मिमी | ७५ मिमी | ९० मिमी |
|---|---|---|---|
| ०.४ पर्यंत | ₹१३,२११ | NA | NA |
| १ पर्यंत | ₹२१,५८८ | ₹२४,१९४ | NA |
| २ पर्यंत | ₹३१,१६७ | ₹३४,६५७ | NA |
| ३ पर्यंत | NA | NA | ₹४६,७७९ |
| ४ पर्यंत | NA | NA | ₹५८,९९५ |
| ५ पर्यंत | NA | NA | ₹६६,७८९ |
किती टक्के अनुदान मिळणार?
- अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना ९०% पर्यंत अनुदान
- इतर शेतकऱ्यांना ७५% पर्यंत अनुदान
- प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ५५% ते ६०%
- उर्वरित अनुदान मुख्यमंत्री सिंचन योजनेतून
PM किसान योजनेचा २०वा हप्ता शनिवारी जमा; ई-केवायसी नसेल तर मिळणार नाही ₹२०००
अर्जाची प्रक्रिया आणि अधिक माहिती
- ही योजना ऑनलाईन अर्जासाठी खुली आहे
- अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://mahadbtmahait.gov.in
- अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
पाण्याची टंचाई असलेल्या महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे. आधुनिक सिंचन प्रणालीमुळे पाणी बचत तर होतेच, पण उत्पादनातही वाढ होते. अशा उपक्रमांतून शाश्वत शेतीचा पाया अधिक बळकट होतोय.
